बहुजननामा ऑनलाइन टीम : जर तुम्ही सर्विस किंवा एक्साइज ड्यूटी संबंधित वादामध्ये अडकले असाल तर तुम्हाला ३१ डिसेंबरपर्यंत मुदत आहे. या दिवसापर्यंत तुम्ही यावर तोडगा काढण्यासाठी रजिस्ट्रेशन करु शकता. सुत्रांकडून माहिती मिळाली आहे की, अर्थ मंत्रालयाकडून ‘सगळ्यांचा विश्वास योजनेची’ शेवटची तारीख वाढवली जाणार नाही. त्यामुळे या प्रकारचे वाद मिटविण्यासाठी अर्थ मंत्रालयाने या योजनेची सुरुवात केली असून त्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2019 – 20 या आर्थिक वर्षाच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात ही योजना आणली होती. या योजनेमागील मंत्रालयाचा हेतू असा होता की, थकबाकीदारांना काही अंशतः सूट देऊन असे सर्व वाद मिटवावेत. 1 सप्टेंबर 2019 पासून सरकारने ही योजना केवळ 4 महिन्यांसाठी लागू केली होती.
या योजनेचा कालावधी लवकरच संपणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सरकार या योजनेचा कालावधी वाढवू इच्छित नसल्याचे समजते. जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे 31 डिसेंबर पर्यंतचा अंतिम वेळ आहे. या योजनेअंतर्गत सरकारला आतापर्यंत 55 हजार 693 अर्ज प्राप्त झाले असून यामध्ये 29.557.3 कोटी रुपयांचा कर विवादास्पद आहे. अर्थ मंत्रायलाने ही योजना सुरु केली तेव्हा, त्यासंबंधी एकूण 1.83 कर बाकी होते, त्यापैकी सुमारे 3.5 लाख कोटी अडचणीत आहे. या योजनेअंतर्गत टॅक्स धारकाला 40 ते 70 % सूट मिळते. त्याचप्रमाणे व्याज आणि दंडापासून देखील त्यांना दिलासा मिळतो.
Visit : bahujannama.com