पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – नेहमी आपल्या शीघ्र कवितांच्या माध्यमातून लोकांच्या हास्यास पात्र ठरणारे आणि त्यातून काही वेळा सुचक इशारा देणारे रिपाइंचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी चक्क अण्णाभाऊ साठे यांच्या गीताचेच विडंबन केले. एवढेच नाही तर पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलताना बँड वाजला म्हणून त्यांनी शिवीगाळही केली.
अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात आठवले बोलत होते. त्यावेळी त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त महाराष्ट्राच्या नवनिर्मितीच्या लढ्यात मोलाचे योगदान देणाऱ्या माझी मैना गावावर राहिला या गीताचे विडंबनच केले. माझी मयना गावाकडे राहिली आणि तो म्हणतो मी मुंबईकडे दुसरी पाहिली. आठवले यांनी हे कार्यक्रमात हे गाणे गायले खरे परंतु आपली चूक लक्षात आल्यावर पुढे सावरून घेतले. त्यानंतर अण्णाभाऊ साठे यांचे चळवळीत मोठे योगदान होते.असे म्हणत त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.