नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – घातक अमली पदार्थांची तस्करी करताना रंगेहात पकडूनही त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई न करता तसेच यासंदर्भातील माहिती आपल्या वरिष्ठांना न देता, काही पैशांच्या खातर नंदनवन पोलीस ठाण्यातील पाच पोलिसांनी लाच घेत आरोपीची सुटका केली आहे. परंतु त्यांनी लपवलेल्या या प्रकरणाचा खुलासा झाला असून या पाचही जणांवर त्यांच्याच पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सचिन एम्प्रेडीवर, राजेंद्र शिरभाते, अभय मारोडे, रोशन निंबार्ते, आणि दिलीप अवगणे असे या पोलिसांचे गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान नंदनवन ठाण्यातील पोलीस कर्मचारी ड्युटीवर असताना त्यांना जमाल नावाचा व्यक्ती अमली पदार्थाची तस्करी करताना रंगेहाथ पकडला, परंतु आरोपी तेथून पळ काढण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी त्याचा शोध घेत रमणा मारूती चौकात पोहचले, तिथे एका टपरीवर चहा पित असताना जावेद नामक व्यक्तीने पोलिसांना लाच देत हे प्रकरण इथेच मिटवण्यास सांगितले. त्यानंतर या पाचही पोलिसांनी नोटांचा बंडल स्वीकारत या घटनेबद्दल मौन बाळगले.
मात्र, शेवटी या पोलिसांची पोल उघडलीच. घटनेच्या तब्बल पाच दिवसानंतर एका अज्ञात व्यक्तीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर लगेचच वरिष्ठांनी याप्रकरणाचा तपास करत, एकून ३४ ग्राम एमडीच्या दोन पुड्या, २ लाख ४० रोकड जप्त केली आहे. या बाबत उपुक्त पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी या पोलिसांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहे.
Visit : bahujannama.com