मथुरा : वृत्तसंस्था – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या पोकळ धमक्यांवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी चोख निशाणा साधला आहे. ते दुश्मनी करतात, तर आता आरपारची लढाई होऊन जाऊ द्या, यावेळी पाकव्याप्त काश्मीरही परत घेऊ. मथुरा येथे आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी इम्रान खान यांच्यावर हा निशाणा साधला.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले गुरुवारी मथुरा येथे आले होते. त्यावेळी तेथील नयति रुग्णालयातील मरोटरी क्लब मार्फत अवयवदान कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
पत्रकरांशी बोलताना ते म्हणाले, इम्रान खान युद्धाची पोकळ धमकी देत आहेत. परंतु पाकिस्तान मांजर आहे. तर आम्ही वाघ. भारताची ताकद खुप मोठी आहे. इम्रान खान भारतासोबत दुश्मनी करत असेल तर त्यांना आमच्यासोबत आरपारची लढाई करावी लागेल. एकदा आम्हाला युद्ध करावे लागणार आहे. त्यानंतर पाकव्याप्त काश्मीर सुद्धा परत घ्यावा लागेल.असे रामदास आठवले म्हणाले.