बीड : बहुजननामा ऑनलाइन – मराठा समाजावरील अन्याय सरकारने दूर करावा. अन्यथा मराठा समाजाला सरकारचं भविष्य ठरवावं लागेल, असा इशारा शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे (vinayak mete) यांनी दिला आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात लवकर निर्णय घ्यावा. अन्यथा मागील वर्षीप्रमाणे मराठे मोर्चे सुरु होतील, असेही विनायक मेटे यांनी म्हटले आहे. बीडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मराठा मोर्चावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
सरकारने दखल घेतली नाही, तर…
मोर्चाला झालेली गर्दी पाहता, तरुणांमध्ये किती रोष आहे हे दिसत आहे.
परंतु हा रोष सरकारला दिसत नाही. म्हणून हे सर्वजण संघर्ष करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत.
जर सरकारने याची दखल घेतली नाही, तर याचे परिणाम संपूर्ण राज्यभरात पहायला मिळतील, असा इशारा विनायक मेटे (vinayak mete) यांनी दिला आहे.
हा सरकारचे वाभाडे काढणारा मोर्चा
विनायक मेटे म्हणाले, मी आता जसं आवाहन केलं तसंच आवाहन सुरुवातीपासून करतो आहे.
हा मूक मोर्चा नाही घोषणा देत सरकारचे वाभाडे काढणारा मोर्चा आहे.
अन्यायाला वाचा फोडणारा मोर्चा आहे, असेही मेटे म्हणाले.
कोरोना नियमांचे उल्लंघन
मराठा आरक्षणाच्या मोर्चासाठी बीड येथील शिवाजी चौकात मोठ्या संख्येने लोक जमले होते.
यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मोर्चा प्रसंगी कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन झाल्याचे पहायला मिळाले.
आगोदर मुक मोर्चा नंतर घोषणा
छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघाला.
आगोदरचे मराठा मोर्चे हे मुक मोर्चे होते.
परंतु आजच्या मोर्चात मोठ्याप्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली.
कृपया हे देखील वाचा:
अद्यापही मनसुख हिरेन प्रकरणाचं गूढ गुलदस्त्याच, रिपोर्टमधून नवीन माहिती समोर
करदात्यांसाठी खुशबखर ! आता मोबाईलवरून भरू शकणार रिटर्न, जाणून घ्या
नाना पेटोलेंच्या विधानावरून राऊतांनी लगावला टोला, म्हणाले – ‘…तर त्या सारखी ऐतिहासिक गोष्ट नाही’
तुम्ही कोणत्याही कागदपत्रांशिवाय सुद्धा बनवू शकता Aadhaar Card, जाणून घ्या काय आहे पद्धत?
…म्हणून आता शिवसेना पाठीत खंजीर खुपसते, या विधानावर कोणीही विश्वास ठेवणार नाही