मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मराठा आरक्षण न्यायप्रविष्ठ असताना राज्यातील ५ कोटी मराठा समाजाच्या आरक्षणासह २१ प्रमुख मागण्याच्या तत्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी करत मराठा क्रांती ठोक मोर्चाने सरकारला आचारसंहितेचा अल्टीमेटम दिला आहे .
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बुधवारी झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत सरकारविरोधी ठराव मांडला. आणि मागण्यांची अंमलबजावणी आचारसंहितेपूर्वी न झाल्यास राज्यभर ५ लाख फलक लावून सरकारविरोधात प्रचार करण्याचा निर्णय घेतल्याचे समन्वयक महेश डोंगरे यांनी सांगितले. आजवर कोणतेही सरकार सतेत असो मराठा समाजचा व्होटबँक म्हणूच वापर केला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा समाजातील नेत्याचा टक्का सार्वधिक असताना सुद्धा त्यांनी समाजाचा विकास केला नाही. या समाजाचा वापर स्वत:चा विकास करण्यासाठी केला.जर सरकाने आरक्षणासहित २१ मागण्या मान्य नाही केल्यात तर सरकारला त्यांचे परिणाम भोगावे लागतील. असे मराठा क्रांती ठोक मोर्च्याच्या आयोजकांनी प्रसार माध्यमाशी बोलतांना सांगितले.