नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानचे कायमस्वरुपी प्रतिनिधी मलिहा लोधी यांनी मोठी चूक केली आणि त्यांनी ट्विटरवर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांना ‘परराष्ट्रमंत्री’ म्हणून लिहिले. लोधी यांनी सुमारे एक तासानंतर हे ट्विट हटवले आणि म्हणाले, ‘शेवटच्या ट्विटमध्ये लिहिण्यात चुकल्याबद्दल क्षमस्व.’ मलिहामुळे पाकिस्तानला त्रास होण्याची ही पहिली वेळ नाही. लोधी यांनी २०१७ मध्ये संयुक्त राष्ट्रांतील एका जखमी मुलीचे फोटो दाखवत सांगितले की, हा काश्मीरमधील ‘क्रौर्याचा’ पुरावा आहे.
खर तर तो फोटो फिलिस्तीनी एका मुलीचा होता ती मुलगी गाजामध्ये इस्राईलच्या हल्ल्यात जखमी झाली होती. एवढेच नाही तर हा फोटो २०१४ च्या पुरस्कार विजेते फोटो ग्राफर हेदी लेवीन यांनी काढलेला होता.
इतक्या दिवसांपासून पाकिस्तान भारताने बालाकोट हल्ला केलाच नाही असे म्हणत होता. मात्र संयुक्त राष्ट्र संघात बोलताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी याबाबत खुलासा केला आहे. भारताने पाकिस्तानमधील बालाकोटवर केलेल्या एअरस्ट्राईक बद्दल इम्रान खान यांनी मान्य केले आहे. यावेळी बोलताना खान यांना अनेक लज्जास्पद प्रश्नाची उत्तरे द्यावी लागली.
काश्मिरातील कलम ३७० रद्द केल्याच्या निर्णयावर इम्रान खान म्हणाले की, भारत RSS च्या अजेंड्यावर सध्या काम करत आहे. जेव्हा कोणी बाहेरचा याबाबत बोलू इच्छितो तेव्हा भारत म्हणतो का हा द्विपक्षीय मुद्दा आहे मात्र पाकिस्तानसोबत यावर चर्चा करत नाही. मी यूएन ने याबाबत दखल देण्याबाबत बोलणार आहे इम्रान खान यांनी यावेळी सांगितले.
Visit : bahujannama.com