मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – अनेक दिवसांपासून लांबणीवर पडलेला सत्तास्थापनेचा तिढा सुटणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. राज्यात लवकरच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊन सरकार स्थापन करणार असल्याची माहिती समोर आली असून त्यामुळे राज्यात महायुतीऐवजी ‘महाशिवआघाडी’ सरकार येणार असल्याचे म्हंटल जात आहे. काँग्रेसचे सर्व आमदार शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देणार असल्याची माहिती मिळाली आहे.
दुसरीकडे कालच राज्यपालांनी भाजपला सत्तास्थापन करण्याचं निमंत्रण दिल आहे. त्यामुळे यासंबधी आज भाजपच्या नेत्यांची बैठक होणार असून भाजप आज सत्तास्थापनेसंदर्भात निर्णय घेणार आहे. परंतु राज्यात भाजप प्रणीत सरकार येऊ नये, म्ह्णून महाशिवआघाडी एकत्र सरकार स्थापन करू शकते , अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.
‘भाजपच्या विरोधात आम्ही मतदान करणार असल्याचं राष्ट्रवादीच्या नवाब मलिक यांनी याआधीदेखील स्पष्ट केलं होत. तसेच राज्यात कुठल्याही परिस्थिती भाजपचे सरकार नको असं राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांचा मत आहे. त्यामुळे राज्याच्या हितासाठी १२ नोव्हेंबरपर्यंत अंतिम निकाल घेऊ असंदेखील नवाब यांनी म्हंटल आहे.
दरम्यान जयपूर येथे काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांची बैठक सुरु आहे. त्यात शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी बाहेरून पाठिंबा देण्याची चर्चा सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे येत्या २-३ दिवसांत महाशिवआघाडी सरकार स्थापन करणार कि नाही हे स्पष्ट होणार आहे.