मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणीत NDA ला घवघवीत यश मिळाले या मिळालेल्या मताधिक्क्यावर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मतमोजणीतील आकडेवारीत तफावत असल्याचा आरोप करत याविरोधात वंचित बहुजन आघाडीने आज (सोमवार) महाराष्ट्रभर ‘EVM हटावो, देश बचावो’ पुकारले आहे. राज्यभरात जिल्हा आणि तालुका मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
यंदाच्या लोकसभेत महाराष्ट्रातल्या सर्व ४८ मतदारसंघात झालेले एकूण मतदान आणि प्रत्यक्ष मोजणी केलेले मतदान यामध्ये तफावत आढळून येते. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करून देखील त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे ‘EVM हटाव देश बचाव’ चा नारा देत वंचित बहुजन आघाडीने दिला आहे. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
अहमदनगर
वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश अध्यक्ष अशोक सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली अहमदनगर जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोर आंदोलन करण्यात आले. EVM हटावो, देश बचावो, विधानसभा निवडणुकित बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे, अशी मागणी करण्यात आली. निवासी जिल्हाधिकारी अनंत पाटील यांना निवेदन देण्यात आले.
पंढरपूर
आघाडीचे प्रवक्ते गोपीचंद पडळकर यांच्याकडून EVM च्या वापरा विरोधात पंढरपूर तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. दरम्यान राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत EVM ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान व्हावे, अशी मागणी करण्यात आली.