मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या रिपाइंचे सर्वेसर्वा तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ‘शरद पवारांना टोला लगावला आहे .ते म्हणाले कि, पवार साहेबांचा ईव्हीएम मशीनवर संशय आहे. परंतु आमचा त्यांच्यावर संशय नाही. त्यांना NDA त येण्याचा सल्लाही आठवलेंनी दिला आहे. वसईत एका आयोजित कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते.
पवार साहेबांनी ईव्हीएमबाबत अनेकदा संशय व्यक्त केला आहे. तयार अजित पवार यांनी याबाबत कोणतेही वक्तव्य केलं नाही ईव्हीएमबाबत अजित पवार यांचीच भूमिका योग्य असल्याचे आठवले यांनी म्हंटले आहे.
आगामी विधानसभेला वंचित बहुजन आघाडी आणि मनसे हे दोघेही स्वबळावर निवडून येऊ शकत नाही तसेच आंबेडकरांनी एनडीएमध्ये यावं, येणाऱ्या विधानसभेसाठी घटकपक्षांना २० जागा हव्या असून २० पैकी १० जागा आरपीआयला मिळाव्यात अशी मागणी रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी केली आहे.
वंचित वर टिका करताना, वंचित आघाडी ही वंचितांना सत्तेपासून वंचित ठेवणारी आघाडी आहे असल्याची टीका आठवले यांनी कोल्हापूर येथे बोलताना केली होती. मुळे आंबेडकरांना सत्ता हवी असेल तर एनडीएमध्ये यावं, असं आठवले यांनी म्हटलं आहे.