मुंबई बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारने आधीच्या टर्म पेक्षा भरगोस मताधिक्याने निवडून आले आणि मोदी सरकारने यावेळी ‘सबका साथ सबका विकास सबका विश्वास अशा घोषणा दिल्या. या मोदी सरकारच्या घोषणेवरून अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे.
नेहमी आपल्या अनोख्या स्टाईलने आंदोलन करणाऱ्या आमदार बच्चू कडू यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून अन्नत्याग आंदोलन केलं असून भर पावसात ते ते एकटेच पायऱ्यांवर बसून आंदोलन करत आहेत.
मोदी सरकारने घोषणा दिल्याप्रमाणे त्यांनी मतदारसंघातील विकासकामं पूर्ण करावीत. सबका साथ सबका विकास याप्रमाणे सर्वांचा विकास करावा आमच्या मागण्या ऐकून घ्याव्यात यासाठी बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन पुकारलं आहे.