मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – यंदाच्या लोकसभेत काँग्रेसप्रणित UPA चे अक्षरशः पानिपत झाले त्यामुळे लोकसभेत झालेल्या चुका टाळून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत समाधानकारक कामगिरी करण्यासाठी काँग्रेसकडून रणनीती ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. याअंतर्गत आता काँग्रेस पक्ष पुन्हा सोशल इंजिनीअरिंगवर भर देणार असल्याची माहिती आहे.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेल्या काँग्रेसच्या पराभवाचं पक्षाकडून आता विश्लेषण करण्यात येत आहे. त्यानुसार काँग्रेसने आपला पारंपरिक जनाधार गमावल्याचं दिसत आहे. दलित आणि मुस्लीम ही पारंपरिक मते काँग्रेसपासून दुरावली आहेत. या समाजाला पुन्हा आपल्याकडे खेचण्यासाठी काँग्रेस आगामी काळात विशेष प्रयत्न करणार आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील दलित नेत्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याची माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे.
वंचित बद्दल काय रणनिती आखणार ?
लोकसभेपूर्वी प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी यांच्याकडून वंचितचा प्रयोग झाला होता त्यात वंचित बहुजन आघाडीला चांगलेच यश मिळाले आहे लोकसभेत वंचितने चांगली मतं घेतली आहेत. याचा थेट फटका काँग्रेसला बसला. दलित आणि मुस्लिम मतदारांना आपल्याकडे वळवण्यात वंचितला चांगलेच यश मिळाले काँग्रेसची दलित ,मुस्लिम ही पारंपारिक मत आहेत. परंतु यावेळी ती वंचितकडे वळल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत वंचितचा फटका बसू नये म्हणून काय रणनीती आखायची यावर काँग्रेसमध्ये विचार सुरू असल्याची माहिती आहे.