मुंबई बहुजननामा ऑनलाईन- यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढल्याने महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा फटका बसला. त्यामुळे काँग्रेसमधील काही नेत्यांनी ‘वंचित’ ही भाजपचीच B टीम असल्याचा आरोप केला होता याबाबत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना विचारले असता वंचितच्या भूमिकेबाबत बोलताना ते म्हणाले की, ‘मतांचं धृवीकरण होऊ नये असा आमचा प्रयत्न होता. त्यामुळेच वंचितला आघाडीत सामावून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद आला नाही. प्रश्न A टीम किंवा B टीमचा नसून हा प्रकार वेगळाच आहे.’
आगामी ‘विधानसभा निवडणुकीत वंचितने आघाडीत यावं, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आम्ही कधीही चर्चा करण्यासाठी तयार आहोत.आज मितीला जागांचा विषय नसून संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे,’ असे मतं अशोक चव्हाण मांडले.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला विधानसभेसाठी ४० जागांचा फॉर्म्युला दिला होता. वंचित बहुजन आघाडी विधानसभेच्या २४८ जागांवर निवडणूक लढवणार असून त्यांना मंजूर असेल तर त्यांनी येत्या १० दिवसांत उत्तर द्यावे,’ असे अल्टिमेटम प्रकाश आंबेडकर यांनी दिला होता.