मुंबई : बहुजनामा ऑनलाइन – राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आठवडा उलटला तरीही राज्यात स्थिर सरकार स्थापन झालेले नाही. निकालात महायुतीला बहुमत मिळाल्याचं स्पष्ट झाले असले तरी सत्तावाटपावरून भाजप शिवसेनेत रस्सीखेच सुरु आहे. भाजपचा प्रस्ताव शिवसेनेला मान्य नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना नवा प्रस्ताव दिला आहे.
दरम्यान लोकसभा निवडणुकीवेळी सत्तावाटपासंदर्भात ठरलेला ५०-५० फॉर्मुला पाळला जावा, अशी मागणी शिवसेनेकडून सातत्याने केली जात आहे. त्या फॉर्मुल्यानुसार अडीच- अडीच वर्ष मुख्यमंत्री पद आणि इतर महत्वाच्या खात्यांत वाटा यावर शिवसेना असून बसली आहे. परंतु भाजप शिवसेनेच्या या आग्रही भूमिकेवर सहमत नसल्याने मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना नवी ऑफर देऊ केली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री या भाजपचाच असेल मात्र राज्यातील मंत्रिमंडळात शिवसेनेला सामान वाटा देऊ, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल आहे. त्यामुळे फडणवीसांची ही नवी ऑफर उद्धव ठाकरे स्वीकारण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
या प्रस्तावानुसार मुख्यमंत्री पदाच्या बदल्यात पंतप्रधान मंत्रिमंडळात एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद तसेच पक्षाच्या दोन जेष्ठ नेत्यांची राज्यपालपदी नियुक्ती केली जावी अशी मागणी शिवसेना करताना दिसत आहे. याशिवाय सहकार क्षेत्रातील संस्थांमध्ये ५० टक्के नियंत्रण असावं अशीही मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थांच्या माध्यमातून हा प्रस्ताव रात्री उशिरा शिवसेनेला दिला. उद्धव ठाकरे देखील या प्रस्तावाबद्दल सकारात्मक असल्याचं दिसत आहेत. त्यामुळे याविषयी चर्चा करण्याचं देखील त्यांनी ठरवलं आहे. याआधी शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद आणि १६ मंत्रिपद देण्याचा प्रस्ताव होता तर भाजप आणि इतर लहान पक्षांना २७ ते २९ मंत्रिपद देण्याचं ठरलं होत. मात्र या नवी प्रस्तावात मंजुरी मिळणार का हे पाहून उत्सुकतेचं आहे, यासंबंधी येत्या दोन दिवसात बैठक होण्याची शक्यता आहे.