मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकच्या २८८ जागांसाठी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ७९८ उमेदवारांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. शनिवारी रात्री उशिरा निवडणूक अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नामनिर्देशन पत्रात सर्व प्रकारच्या चुका आढळून आल्या असून त्यानंतर त्या नाकारल्या गेल्या आहेत.
निवडणूक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ४७३९ उमेदवारांचे अर्ज वैध असल्याचे आढळले आहे. ७ ऑक्टोबर ही महाराष्ट्रातील अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. २१ ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तसेच २४ ऑक्टोबर निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
निवडणूक आयोगाने २१ ऑक्टोबरला महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये २१ ऑक्टोबरला एका टप्यात मतदान आणि २४ ऑक्टोबर रोजी निकालाची तारीख जाहीर केली होती. महाराष्ट्रातील २८८ जागांसाठी मतदान होणार आहे. त्याचबरोबर हरियाणामधील ९० जागांसाठी २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. महाराष्ट्रात ८.९४ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. महाराष्ट्राच्या २८८ सदस्यांच्या विधानसभा सभेचा कार्यकाळ ९ नोव्हेंबर रोजी संपत आहे. यावेळी आयोग निवडणूक खर्चावर विशेष लक्ष ठेवून आहे. ३० दिवसांमध्ये उमेदवाराला निवडणुकीच्या खर्चाचा हिशेब द्यावा लागेल.
Visit : bahujannama.com