बहुजननामा ऑनलाईन टीम – राज्यातील २८८ जागांवर केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केल्या आहेत. यात राज्यात २१ ऑक्टोबरला मतदान आणि २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. यादरम्यान मतदान आणि मतमोजणी यामध्ये तीन दिवसाचे अंतर आहे, यावर वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आक्षेप घेतला आहे. यावेळी बोलताना आंबेडकर म्हणाले, ” एकाच दिवशी राज्यात मतदान होणार आहे याचे आम्ही स्वागत करतो. परंतु मतदान आणि मतमोजणी यांच्यात तीन दिवसांचे अंतर आहे. या तीन दिवसात काहीही गडबड होऊ शकते. यासंदर्भात आम्ही लवकरच निवडणूक आयोगाकडे याविषयी तक्रार करणार असून मतदानाच्या दुसऱ्या दिवशीच मतमोजणी करण्याची मागणी करणार आहोत. ”
राजू शेट्टींना वंचित बहुजन मध्ये जागा नाही
वंचितवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आरोप केला आहे कि, वंचित आघाडी हि भाजपची बी टीम आहे. प्रकाश आंबेडकरांनी या आरोपाचा समाचार घेताना म्हणाले की, “काँग्रेस राष्ट्रवादीचा हा आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. या दोन्ही पक्षांच्या नेत्यांवर गुन्हे हे दाखल झाले आहेत. आमच्यावर आरोप करण्यासाठी त्यांनी सत्ताधाऱ्यांशी सौदा केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच माजी खासदार राजू शेट्टी यांना वंचित बहुजन आघाडीमध्ये कोणतेही स्थान असणार नाही. त्याचबरोबर अन्य अपक्ष उमेदवारांना देखील पाठिंबा असणार नाही. मात्र मित्र पक्षासाठी आम्ही आवश्यक त्या जागा सोडू. “असे त्यांनी स्पष्ट केले.
बंद खोलीत आवाडेंशी चर्चा
प्रकाश आंबेडकर आणि माजी मंत्री प्रकाश आवाडे यांची इचलकरंजीत भेट झाली. २० मिनिटे दोघांमध्ये बंद खोलीत चर्चा झाली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप समोर आले नाही. मात्र प्रकाश आवाडे यांनी यावर बोलताना सांगितले की, “या भेटीत राजकीय स्थितीबद्दल औपचारिक चर्चा झाली आहे.
Visit : bahujannama.com