मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात आज 70 कोरोना (Coronavirus) रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 3 हजार 009 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून सध्या राज्यात 52 हजार 365 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यात आता लसीकरणाची तयारी करण्यात येत असली तरी राज्यातील कोरोनाची परिस्थिती थोडी चिंताजनक आहे. आज राज्यात 3009 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आजपर्यंत रुग्ण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 18 लाख 74 हजार 279 इतकी झाली आहे. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.75 टक्के एवढे आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असले तरी बाधित रुग्णांचा आकडाही काहींसा चिंता वाढवणारा आहे. आज राज्यात 3 हजार 556 कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 19 लाख 78 हजार 044 इतके झाले आहे. तर राज्यात सध्या 56 हजार 365 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज दिवसभरात 70 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत 50 हजार 221 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यू दर 2.54 टक्के एवढा आहे.
राज्यात आज 3556 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 3009 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1874279 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 52365 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.75% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) January 13, 2021
Maharashtra reports 3,556 new COVID-19 cases, taking tally to 19,78,044; 70 deaths push toll to 50,221: state health department
— Press Trust of India (@PTI_News) January 13, 2021