मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यातील कोरोना संसर्ग वाढत असून, दररोज मोठ्या प्रमाणावर नवीन कोरोनाबाधित आढळून येत आहे. याशिवाय, मृत्यूंच्या संख्येतही भर पडतच आहे. मात्र, एकीकडे ही परिस्थिती असताना मागील तीन दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या देखील वाढत असल्याचे दिसून आले आहे. याच दरम्यान राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या एक लाखाच्या जवळ पोहचल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. आज राज्यात गेल्या 24 तासात 13 हजार 659 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
Maharashtra reports 13,659 new #COVID19 cases, 9,913 discharges and 54 deaths in the last 24 hours.
Total cases: 22,52,057
Total recoveries 20,99,207
Death toll 52,610
Active cases 99,008 pic.twitter.com/GQV7tn8R4l— ANI (@ANI) March 10, 2021
आज राज्यात 54 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 52 हजार 610 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील सध्याचा मृत्यू दर 2.34 टक्के इतका आहे. तर आज दिवसभरात 9 हजार 913 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत 20 लाख 99 हजार 207 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.21 टक्के इतके झाले आहे.
सध्या राज्यात 99 हजार 008 ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 71 लाख 15 हजार 534 प्रयोगशाळा नमुन्यापैकी 22 लाख 52 हजार 057 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 13.16 टक्के इतके आहे. सध्या 4 लाख 71 हजार 187 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत, तर 4 हजार 244 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.