मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात कोरोनानं पुन्हा एकदा हातपाय पसरवण्यास सुरुवात केल्यानं आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. डिसेंबरपासून राज्यातील रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत होती. मात्र, आता कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. काल आठ हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर आज (शुक्रवार) पुन्हा रुग्ण संख्येत वाढ झाल्याने राज्याचे टेन्शन वाढलं आहे. राज्यात गेल्या 24 तासात 10 हजार 216 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
Maharashtra reports 10,216 new #COVID19, 6467 discharges and 53 deaths in the last 24 hours.
Total cases 21,98,399
Total recoveries 20,55,951
Death toll 52,393Active cases 88,838 pic.twitter.com/qIYAab37W3
— ANI (@ANI) March 5, 2021
आज राज्यात 53 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 52 हजार 393 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील सध्याचा मृत्यू दर 2.38 टक्के इतका आहे. तर आज दिवसभरात 6 हजार 467 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत 20 लाख 55 हजार 951 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.52 टक्के इतके झाले आहे. राज्यात रुग्ण वाढीबरोबर मृतांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे.
सध्या राज्यात 88 हजार 838 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 66 लाख 86 हजार 880 प्रयोगशाळा नमुन्यापैकी 21 लाख 98 हजार 399 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 13.17 टक्के इतके आहे. सध्या 4 लाख 10 हजार 411 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत, तर 4 हजार 203 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.