मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – मार्चच्या सुरुवातीच्या आठवड्यातच राज्यातील कोरोनानं पुन्हा रौद्र रुप धारण केलं आहे. गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या वर्षातील सर्वाधिक 8 हजार नव्या रुग्णांची नोंद झाली होती. आता मार्चच्या पहिल्याच आठवड्यात विक्रमी कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाच्या नव्या रुग्णांचा आकडा 9 हजारांच्या वर गेला आहे. मुंबई-पुण्याचा धोका सर्वाधिक वाढला आहे.
राज्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात राज्यात तब्बल 9 हजार 855 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेले काही दिवस हा आकडा 8 हजारांवर होता. मात्र, आजचा आकडा राज्याची चिंता वाढवणारा आहे. सर्वात जास्त कोरोना रुग्णांची नोंद आज झाली आहे. पुणे आणि मुंबईत आज सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यात दिवसभरात 853 तर मुंबईत 1121 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
राज्यात आज 9855 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 6559 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2043349 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 82343 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.77% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 3, 2021
राज्यातील आजची कोरोना रुग्णांची आकडेवारी
एकूण रुग्ण – 21,79,185
उपचार घेत असलेले रुग्ण – 82,343
दिवसभरातील नवे रुग्ण – 9,855
दिवसभरात बरे झालेले रुग्ण – 6,559
एकूण बरे झालेले रुग्ण – 20,43,349
दिवसभरातील मृत्यू – 42
मृत्यूचे प्रमाण – 2.40 %
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण – 93.77 %