मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात कोरोनानं पुन्हा एकदा हातपाय पसरवण्यास सुरुवात केल्यानं आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी आठ हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात गेल्या 24 तासात 8 हजार 293 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
Maharashtra reported 8,293 new COVID-19 cases, 3,753 recoveries, and 62 deaths in the last 24 hours, as per State Health Department
Total cases: 21,55,070
Total recoveries: 20,24,704
Death toll: 52,154
Active cases: 77,008 pic.twitter.com/WS6UAByWLv— ANI (@ANI) February 28, 2021
आज राज्यात 62 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 52 हजार 154 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील सध्याचा मृत्यू दर 2.42 टक्के इतका आहे. तर आज दिवसभरात 3 हजार 753 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत 20 लाख 24 हजार 704 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.95 टक्के इतके झाले आहे. राज्यात रुग्ण वाढीबरोबर मृतांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे.
सध्या राज्यात 77 हजार 008 ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 62 लाख 84 हजार 612 प्रयोगशाळा नमुन्यापैकी 21 लाख 55 हजार 070 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 13.23 टक्के इतके आहे. सध्या 3 लाख 35 हजार 492 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत, तर 3 हजार 332 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.