मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात पुन्हा कोरोनाने उचल खाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चिंतेचे वातावरण झाले आहे. आज (गुरुवार) राज्यात पाच हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारी नुसार, आज (गुरुवार) राज्यात 5 हजार 427 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून 38 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
Maharashtra reported 5,427 new COVID-19 cases, 2,543 discharges, and 38 deaths in the last 24 hours, as per State Health Department
Total cases: 20,81,520
Total recoveries: 19,87,804
Active cases: 40,858
Death toll: 51,669 pic.twitter.com/kj8NUUigJw— ANI (@ANI) February 18, 2021
राज्यात गुरुवारी 5 हजार 427 नव्या रुग्णांची भर पडली आहे. आज राज्यात 38 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 51 हजार 669 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील सध्याचा मृत्यू दर 2.48 टक्के इतका आहे. तर आज दिवसभरात 2 हजार 543 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आजपर्य़ंत 19 लाख 87 हजार 804 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.87 टक्के इतके झाले आहे.
सध्या राज्यात 40 हजार 858 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 55 लाख 21 हजार 198 प्रयोगशाळा नमुन्यापैकी 20 लाख 81 हजार 520 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 13.41 टक्के इतके आहे. सध्या 2 लाख 16 हजार 908 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत, तर 1 हजार 743 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.