मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Maharashtra Politics News | उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत मतभेद नाही तर मनभेद झालेत, त्यांनी विश्वासघात केला आहे. त्यामुळे भाजप (BJP) त्यांच्यासोबत कधीच जाणार नाही, त्यांच्यासाठी भाजपची दारं बंद झाली आहेत, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी म्हटले. मात्र, अजित पवारांनी (Ajit Pawar) कधीही विश्वासघात केला नाही, त्यांच्यासोबत मतभेद आहे, पण मनभेद कधीच (Maharashtra Politics News) झालेला नाही, असंही बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. ते एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते.
संजय राऊतांवर (Sanjay Raut) निशाणा साधताना बावनकुळे म्हणाले, राऊतांनी सकाळची वैयक्तिक टिकाटिप्पणी बंद करावी, वैयक्तिक आरोप करु नये, तुम्ही विकासावर बोला, त्यावर आपण चर्चा करु असं आवाहन त्यांनी केलं. अजित पवारांनी एकदोनदा विकासावर (Maharashtra Politics News) भाष्य केलं, पण इतर विरोधकांनी नेहमीच वैयक्तिक टीका केल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आगामी निवडणुकीबाबत भाष्य करताना बावनकुळे यांनी सांगितले की, विधानसभेच्या (Assembly Election)
200 आणि लोकसभेच्या (Lok Sabha Election) 48 जागा जिंकण्याचं भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचं
(Shivsena Shinde Group) टार्गेट आहे. राज्यात भाजपचे 124 पेक्षा जास्त आमदार निवडून येतील.
ज्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचे उमेदवार असतील त्या ठिकाणी त्यांना शंभर टक्के भाजप मदत करेल,
असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.
Web Title :- Maharashtra Politics News | bjp chandrashekhar bawankule on shivsena uddhav thackeray sanjay raut
हे देखील वाचा :
Pune Crime News | शिवाजीनगर न्यायालयात महिला वकिलाचा विनयभंग