मुंबई : बहुजननामा ऑनलाइन– Maharashtra Political Crisis | उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) आश्वासक राजकीय भवितव्याला खिंडार पाडण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रात राजकीय सत्तांतरासह, 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election) भारतीय जनता पक्षाने (BJP) त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवला आहे. आता भाजपा उत्तर प्रदेश (UP), बिहार (Bihar) आणि महाराष्ट्र (Maharashtra) या देशातील तीन मोठ्या राज्यांमध्ये एकाच वेळी सत्तेत आहे. (Maharashtra Political Crisis)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
ही तीन राज्ये मिळून एकूण 168 खासदार लोकसभेत पाठवतात. भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाकडे महाराष्ट्रासाठी ’मेगा डेव्हलपमेंट प्लॅन’ तयार आहे, ज्यामध्ये 2024 साठी रखडलेल्या मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे पुनरुज्जीवन करणे समाविष्ट आहे.
भाजप 2024 मध्ये मतदारांसमोर महाराष्ट्र ते उत्तर प्रदेशपर्यंत पसरलेले आपले विकासाचे अखिल भारतीय मॉडेल दाखवेल. उद्धव ठाकरेंच्या स्पष्ट संदर्भात, पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की महाराष्ट्रातील ‘पलटवार‘ सध्याच्या भाजप राजवटीचा एक महत्त्वाचा सिद्धांत देखील अधोरेखित करतो, तो म्हणजे ‘पाठीवर वार करणार्यांना‘ वाढण्याची दुसरी संधी न देणे आणि त्यांच्यावर जोरदार प्रहार करण्याचा समावेश आहे. (Maharashtra Political Crisis)
भाजपासाठी एकाच वेळी यूपी, महाराष्ट्र आणि बिहारमध्ये सत्तेत राहणे 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी, 2019 च्या परिस्थितीची पुनरावृत्ती आहे, जेव्हा तीन मोठ्या राज्यांमध्ये एनडीएची सत्ता होती आणि लोकसभेच्या 168 पैकी 144 जागा जिंकल्या होत्या.
2019 च्या निवडणुकीतील काळाची पुनरावृत्ती
अशा प्रकारे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने विक्रमी 352 जागा मिळवल्या होत्या. 2019 पूर्वी, भाजपाने 2017 मध्ये बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वात एनडीएचे सरकार स्थापन केले होते, जेव्हा जदयून लालू प्रसाद यादव यांच्या राजद सोबतची आघाडी तोडली होती.
त्यावेळी भाजपा युपीमध्ये मोठ्या कालावधीनंतर सत्तेत आली होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर युतीच्या बाहेर पडण्यापूर्वी शिवसेनेसोबत महाराष्ट्रात त्यांचे सरकार होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
जास्त काळ टिकत नाहीत अनैसर्गिक राजकीय युती
भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने म्हटने की, विरोधी राजकीय विचारधारा असलेल्या अनैसर्गिक राजकीय युती जास्त टिकत नाहीत.
नितीश कुमार आणि लालू प्रसाद (Lalu Prasad Yadhav) यांनी 2015 मध्ये बिहारमध्ये प्रयत्न करून राज्याच्या निवडणुका जिंकल्या,
परंतु नितीश कुमार एनडीएमध्ये परतल्याने युती तुटली.
त्याचप्रमाणे महाराष्ट्रात शिवसेनेची (Shivsena) काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतची (NCP) युती संधीसाधू होती,
जिने हिंदुत्वाच्या मुळ मुद्द्यावर शिवसेनेला फसवले आणि पक्षाच्या 55 पैकी 39 आमदारांनी उद्धव साथ बाजू सोडली.
उद्धव ठाकरेंना कधीही माफ करणार नाही भाजपचे वरिष्ठ नेतृत्व
भाजप पुन्हा शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची शक्यता वर्तवली जात असताना,
भाजपा सूत्रांचे म्हणणे आहे की असा विचार भाजपच्या अजेंड्यावर कधीच नव्हता.
किंबहुना, महाराष्ट्रातील मागील निवडणुकीतील जनादेश शिवसेनेसोबत युतीसाठीच होता, असा भाजपचा नेहमीच दावा आहे.
2019 च्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेची निवडणूकपूर्व युती महाराष्ट्रातील जनतेने सहजपणे बहुमताच्या आकड्यापर्यंत नेली.
सूत्रांचे म्हणणे आहे की, पक्षाला फसवूण काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्याबद्दल भाजपचे सर्वोच्च नेतृत्व उद्धव ठाकरे यांना कधीही माफ करणार नाही.
बीएमसी निवडणुकीवर (BMC Election 2022) होणार परिणाम
शिवसेनेचे 39 आमदार वेगळे झाल्याने उद्धव ठाकरे यांच्या राजकीय भवितव्य,
पक्षाचे चिन्ह आणि नावावर असलेल्या पकडीवर आता महत्त्वाचे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याचे पडसाद अनेक दशकांपासून शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या बृहन्मुंबई महापालिकेच्या (बीएमसी) येत्या निवडणुकीत दिसणार आहेत.
सध्या उद्धव ठाकरे यांचे राजकीय भवितव्य विस्मृतीत ढकलण्यासह भाजपने 2019 चा बदला घेतला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update