नागपुर :बहुजननामा ऑनलाईन – Maharashtra Lockdown | राज्यात नुकतंच कोरोनाबाधित रुग्णसंख्या घटत असल्याची चर्चा होती. मात्र काही ठिकाणी बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभुमीवर बोलताना राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) मोठं विधान केलं आहे. राज्यात आता निर्बंध लागले तर संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra Lockdown) लागतील, असं मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. नागपूरात रुग्णसंख्या वाढत असल्याने तेथे निर्बंध घोषीत केले जाण्याबाबच्या प्रश्नावर बोलताना राज्यातील लॉकडाऊन बाबत त्यांनी आपली भूमिका मांडली. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
त्यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) म्हणाले की, नागपूरसह महाराष्ट्रात कडक निर्बंध लावण्याची सध्या चर्चा नाही. राज्यात निर्बंध लावले जातील अशी पुढील काही दिवसांसाठी शक्यता दिसत नाही. तिसरी लाट येणार हे अटळ आहे. सध्या तिसरी लाट उंबरठ्यावर आली आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. निर्बंध लावण्याबाबत निर्णय मुख्यमंत्री घेतात. मात्र, अद्याप तरी राज्यात निर्बंध कडक करणार असं सुतोवाच नाही, असे ते म्हणाले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
नागपुरबाबत (Nagpur) निर्बध लावले जातील असं मंत्री नितीन राऊत (Minister Nitin Raut) म्हणाले होते. यावरुन मंत्री वडेट्टीवार यांना विचारण्यात आल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नितीन राऊत यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असावी. याबाबत माहित नाहीत.
माहिती घेऊन मी सांगेन. पण निर्बंध लावायचे की नाही हे रुग्णसंख्येवर अवलंबून आहे.
निर्बंध लागले तर संपूर्ण राज्यासाठी लागतील, असं देखील वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे.
Web Title : Maharashtra Lockdown | maharashtra lockdown will there be stricter restrictions state again minister vijay wadettiwar.
Sharad Pawar | सरसंघचालकांच्या ‘त्या’ वक्तव्याने माझ्या ज्ञानात भर पडली’; शरद पवारांचा टोला
Uday Samant | राज्यातील महाविद्यालये ‘या’ तारखेपासुन सुरु होणार – उदय सामंत यांची घोषणा