मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे राज्यासह देशात लॉकडाऊन जाहिर केले होते. त्यानंतर अनलॉकची प्रक्रिया राबविण्यात आली आहे. आता देशातील विविध राज्यात अनलॉकची प्रक्रिया त्या त्या सरकारच्या निर्णयानुसार राबविली जात आहे. यातच महाराष्ट्र राज्यात अनलॉक 4.0 असल्याचे नुकतेच जाहिर केले आहे. यात कोणत्या बाबींबध्ये सूट दिली आहे? आणि कोणत्या बाबीत नाही? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे जाणून घेऊया महाराष्ट्र राज्यातील अनलॉक 4.0 चे नियम आणि इतर माहिती.
केंद्र सरकारने अनलॉक 4 च्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. त्यानंतर आज राज्यातील अनलॉक 4 च्या गाईडलाईन्स जाहीर होणार आहेत. यानुसार कोरोनाच्या संकटात 1 जूनपासून हळूहळू अर्थव्यवस्था पूर्वपदावर येणार आहे, असे म्हंटले आहे. अनलॉकचा चौथा टप्पा 1 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. पहिल्या तीन टप्प्यांपेक्षा अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात आणखी नियम शिथिल होत आहेत.
1 जूनच्या तुलनेत 1 सप्टेंबरमध्ये अर्थव्यवस्थेतील अनेक घटक आणि सुविधा सेवा सुरळीत सुरू करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून नवीन गाईडलाइन्स जारी केल्या होत्या. त्यावर आज राज्य सरकार काय निर्णय घेणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनंतर राज्यात ई-पास रद्द करण्याबाबत राज्य सरकारच्या विचाराधीन असल्याचे आढळत आहे.
यात मिळणार सूट
– प्रशासनाने ई पास रद्द करण्याबाबत तयारी दाखवली आहे.
– राज्य सरकारी कार्यालयामध्ये उपस्थिती वाढवणार आहे.
– सध्या 15% हून 30% उपस्थिती वाढवण्याचा विचार आहे.
– रेस्टॉरंट टप्प्या टप्प्याने सुरू करण्याची शक्यता वर्तविली आहे.
– मेट्रो रेल्वे, जिम, मंदिर आता एवढ्यातच सुरू करण्याबाबत सरकारचा विचार नाही.
केंद्र सरकारच्या गाईडलाईननुसार, काय सुरू होणार आणि काय बंद राहणार?
– 7 सप्टेंबरपासून मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून परवानगी दिली आहे.
– 21 सप्टेंबरपासून सामाजिक, शैक्षणिक, खेळ, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक राजनैतिक कार्यक्रमांना केवळ 100 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. यात सोशल डिस्टन्सिंग, थर्मल स्कॅनिंग आणि सॅनिटाझरचा वापर असणे बंधनकारक आहे.
– 21 सप्टेंबरपासून 50 टक्के क्लास आणि शाळा सुरू करण्यासाठी 50 टक्के विद्यार्थ्यांना शाळेत बोलवण्याची परवानगी दिली आहे.
– 21 सप्टेंबरपासून कंटेनमेंट झोन व्यतिरिक्त इतर ठिकाणी इयत्ता 9वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या सहमतीनं शाळा सुरू करण्याची परवानगी दिली आहे.
– एका राज्यातून दुसर्या राज्यात किंवा त्याच राज्यात लोकांच्या हालचालीवर कोणतेही बंधन घातले जाणार नाही. तसेच यासाठी कोणत्याही परवानगीची गरज भासणार नाही.
– तांत्रिक आणि व्यावसायिक कार्यक्रम ज्यात उच्च शिक्षण संस्था 21 सप्टेंबरपासून पदव्युत्तर आणि पीएचडी विद्यार्थ्यांसाठी लॅब आणि प्रॅक्टीकल प्रोजेक्ट सुरू करण्याची परवानगी दिली आहे.
या सेवा आणि सुविधांवर राहणार निर्बंध
– सिनेमा हॉल, स्वीमिंग पूल, मनोरंजन पार्क, थिएटर (ओपन एअर थिएटर वगळता) आणि अशा काही ठिकाणांवर अजूनही निर्बंध ठेवले आहेत.
– कंटेनमेंट झोन वगळता राज्य किंवा केंद्र सरकारसोबत चर्चा न करता स्थानिक पातळीवर आता लॉकडाऊन जाहीर करता येणार नाही.