सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजप सरकारने पाकिस्तानवर एयर स्ट्राईक केले होते त्यावरून देशभरात उलटसुलट चर्चाही झाली परंतु तरीही दहशतवादावर ठोस उपाय काढण्यात आपल्याला अजूनही यश आलेले नाही त्यातच वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केले आहे “आपल्या देशातील दहशतवाद संपवायचा असेल तर भारताने जागतिक स्तरावरील बंधनाचा विचार न करता पाकिस्तानला संपवावे “असे वक्तव्य केले.
आगमी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते़ यावेळी बहुजन वंचित आघाडीचे प्रदेश प्रवक्ता आनंद चंदनशिवे आदी मान्यवर व वंचित बहुजन आघाडीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
आंबेडकर म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आम्ही १४ टक्के मते मिळवली. त्यामुळे आम्हीच मुख्य विरोधक आहोत. लोकसभा निवडणुकीतऔरंगाबाद वगळता इतर ठिकाणी मुस्लिम मतदार आमच्यासेबत आला नाही. शेवटच्या क्षणी हा मतदार आमच्यापासून दूर गेला. असेही ते म्हणाले.