बहुजननामा ऑनलाईन टीम – Maharashtra in corona | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी म्हटले की, राज्यात कोविड-19 महामारीमुळे लावलेल्या प्रतिबंधामध्ये सूट ऑक्सीजनच्या उपलब्धतेवर अवलंबून असेल. त्यांनी म्हटले की, हे लोकांवर आहे की, त्यांनी महामारीच्या तिसर्या लाटेला (Maharashtra in corona) रोखायचे की आमंत्रण द्यायचे. डिजिटल माध्यमातून वैद्यकीय संमेलनाचे उद्घाटन करताना ठाकरे यांनी राजकीय पक्षांना म्हटले की, त्यांनी राजकारण करू नये आणि ती ठिकाणे उघडण्याची मागणी करूनये, जिथे गदी टाळू शकत नाही.
या डिजिटल संमेलनात संपूर्ण राज्यातून डॉक्टर आणि राज्य कोविड-19 कार्यदलाचे सदस्य सहभागी होत आहेत. मुख्यमंत्री म्हणाले, लोकांच्या जीवनाशी खेळू नका. विरोध करा परंतु कोविड-19 च्या विरूद्ध. हे आपल्यावर आहे की, कोविड-19 महामारीची तिसरी लाट रोखायची की तिला आमंत्रण द्यायचे.
आरोग्य यंत्रणा अद्ययावत
ठाकरे यांनी दावा केला की, महाराष्ट्र एकमात्र राज्य आहे ज्याने महामारीला तोंड देण्यासाठी आपली आरोग्य यंत्रणा अद्यावत केली.
देशात असे कोणत्याही राज्याने केलेले नाही.
आपण ऑक्सीजन उत्पादनाच्या कमतरतेचा सामना करत आहे ज्यात थोडा वेळ लागेल.
ऑक्सीजनची मोठी गरज
ठाकरे पुढे म्हणाले, सध्या आपले दैनिक उत्पादन 1,200 ते 1,300 मेट्रिक टन आहे ज्याचा वापर उद्योग आणि उपचारासाठी केला जात आहे. इस्पात, काच आणि फार्मा उद्योगात ऑक्सीजनची आवश्यकता असते.
आपल्याला रोज इतर रूग्णांसाठी 150 मेट्रिक टन ऑक्सीजनची आवश्यकता असते आणि 200 मेट्रिक टन आवश्यकता कोविड-19 रुग्णांसाठी असते.
किती ऑक्सीजनची आहे गरज?
ठाकरे म्हणाले, कोविड-19 महामारीच्या दरम्यान राज्यात ऑक्सीजनची दैनिक गरज 1,700 ते 1,800 मेट्रिक टन होती, जो इतर राज्यांकडून खरेदी केला जात होता.
ठाकरे म्हणाले की, त्यांनी राज्यात ऑक्सीजनचे उत्पादन सध्याच्या 1,400 मेट्रिक टनावरून वाढवून 3,000 मेट्रिक करण्याचे निर्देश दिले आहेत, परंतु यासाठी थोडा वेळ लागेल.
प्रकरणांमध्ये वाढ झाल्यास कदाचित आपल्याला दुसर्या राज्यांकडून योग्यप्रमाणात ऑक्सीजन मिळू शकणार नाही.
दैनिक प्रकरणांमध्यें वाढ झाली
मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, कोविड-19 ची दुसरी लाट असूनही स्थिती नियंत्रणात आहे.
मात्र, मागील काही दिवसात दैनिक प्रकरणांमध्यें वाढ झाली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, आपल्याला गर्दी टाळली पाहिजे. धैर्य राखावे लागेल.
आपल्याला सध्या खुली ठिकाणे बंद करण्याची गरज भासली नाही पाहिजे.
ते पुढे म्हणाले, लोकांनी समजून घेतले पाहिजे की, शत्रूला अजूनही पूर्णपणे पराभूत करता आलेले नाही, त्याचे सावट अजूनही आहे.
Web Title : Maharashtra in corona | relaxation in covid 19 restrictions will depend on availability of oxygen uddhav thackeray
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Dhananjay Munde | धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करणार्या करूणा शर्मांना ‘या’ कारणामुळं अटक