हिंगोली बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत प्रस्थापित पक्षांना आवाहन देत भरगोस मतं मिळवली त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने राज्यातील मतदारांना चांगलेच आकर्षित केले. आगामी विधानसभा निवडणुकीतही वंचितने आक्रमक भूमिका घेतल्याने आघाडीच्या आडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी गेमचेंजर म्हणून समोर येण्याची शक्यता आहे. येथे भलेही वंचित खातं उघडू शकेल का यावर प्रश्नचिन्ह असले तरी ते आघाडीचा खेळ बिघडवू शकतात, हे निश्चित.
यंदाच्या लोकसभेत शिवसेनेने हिंगोलीत शानदार विजय मिळवला. याठिकाणी सुभाष वानखेडे यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. काँग्रेसच्या पराभवाचे अंतर वंचित बहुजन आघाडीमुळे चांगलेच वाढले. लोकसभेला हिंगोलीत येणाऱ्या सर्वच्या सर्व सात मतदार संघात वंचितने प्रभावी कामगिरी केली असून काँग्रेसची पारंपरिक मते मोठ्या प्रमाणात विभागली गेली. २०१४ मध्ये या तीनही मतदार संघात शिवसेना, भाजप आणि काँग्रेस यांना प्रत्येकी एक जागा मिळाली आहे.
लोकसभा निवडणुकीत या तीनही मतदार संघांत वंचितने २० हजारहून अधिक मते घेतली आहेत. तर काँग्रेसला तिन्ही मतदार संघात मिळालेली मते आणि वंचितची मते एकत्र केले तरी शिवसेनेचे अर्थात युतीचे मताधिक्य अधिकच असल्याचे स्पष्ट होते. दरम्यान ,परंतु लोकसभेला जी स्थिती होती ती विधानसभेला कायम राहिल का ? हे सांगता येत नाही त्यामुळे आघाडीला वंचितवर पर्याय काढतानाच विजयासाठी आणखी काही मार्ग शोधावे लागणार आहे.