मुंबई :बहुजननामा ऑनलाईन – राज्यात अनेक दिवसांपासून सुरु असलेले राजकीय नाटय संपत समपुष्टात असले असून देवेंद्र फडणवीस यांनीं राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ‘महाविकासआघाडी’चे सरकार स्थापन होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. मात्र शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षाची विचारधारणा भिन्न असल्याने महाविकासआघाडीच्या सरकारवर विविध प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. या प्रश्नांवर पडदा टाकत महाविकासआघाडीचे सरकार पुढील ३० वर्षं टिकेल असा विश्वास काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
महाविकासआघाडी उद्धव ठाकरे यांचा नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात एक स्थिर सरकार स्थापन करणार आहे. सगळ्यांना एकत्र घेऊन सरकार चालविणे अशी उद्धव ठाकरेंची भावना आहे. तसेच सर्वप्रथम शेतकऱ्यांना मदत करण्याचे काम हे सरकार करणार असल्याचे देखील नाना पटोले यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांनी एकमताने मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड केली. त्याच पार्श्वभूमीवर उद्या २८ नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान महाविकासआघाडीच्या बैठकीच्या वेळी भाजपवर निशाणा साधत म्हणाले कि, ३० वर्ष ज्यांच्याशी मैत्री केली त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही, ज्यांच्याविरोधात ३० वर्ष लढतो ते मात्र माझ्या नेतृत्वावर विश्वास दाखवत आहेत.
Visit : bahujannama.com