मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – येत्या सोमावरपासून म्हणजे 7 जूनपासून राज्यात पाच स्तरांमध्ये अनलॉक (Unlock. ) होणार आहे. राज्यातील (Maharashtra Unlock. ) अनलॉकबाबत आदेश जारी करण्यात आले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी पुढील आठवड्यात होणार आहे. म्हणजेच येत्या सोमवारपासून राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु होईल, असे आदेशात नमूद केले आहेत.
कोरोना पॉझिटिव्हिटी (Positivity) दर आणि ऑक्सिजन बेड्सची (Oxygen beds) उपलब्धता या आधारावरच आता निर्बंध शिथील केले जाणार आहेत.
त्यासाठी एकूण 5 स्तर निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार त्या त्या जिल्ह्यांमध्ये अनलॉक होईल
अनलॉकच्या 5 स्तरातील जिल्हे
पहिला स्तर – लातूर, नागपूर, नांदेड, अहमदनगर, चंद्रपूर, धुळे, वर्धा, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, जालना, जळगाव, ठाणे
दुसरा स्तर – नाशिक नंदूरबार, पालघर, उस्मानाबाद, परभणी, मुंबई शहर, मुंबई उपनगर, औंरंगाबाद, हिंगोली, गडचिरोली
तिसरा स्तर – पुणे, बीड, यवतमाळ, अकोला, वाशिम, अमरावती
चौथा स्तर – रायगगड, सिंधुदुर्ग, सांगली, रत्नागिरी
पाचवा स्तर – कोल्हापूर
या प्रमाणे त्या त्या स्तरावर जिल्हे अनलॉक केले जाणार आहेत. या आदेशानुसार पहिल्या आणि दुसऱ्या स्तरात जे जिल्हे येणार आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. तसेच दर आठवड्याला कोरोनाच्या परिस्थितीनुसार हे जिल्हे बदलणार आहेत.
कृपया हे देखील वाचा:
शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंचे नवं ट्वीट, शेअर केला ‘हा’ फोटो
डार्क मोडमध्ये कधीही वापरू करू नका स्मार्टफोन, होऊ शकते मोठे नुकसान
मराठा आरक्षण रद्द होण्यामागे ‘हे’ दोन प्रमुख कायदेशीर मुद्दे; जाणून घ्या