मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात महिन्याभरापासून सुरु असलेल्या राजकीय नाट्य जवळपास संपत आले असून महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे नवे महाविकासआघाडीचं सरकार स्थापन होणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अवघ्या साडेतीन दिवसांत कोसळल्यानं महाविकासआघाडीच्या नेत्यांनी भाजपाची खिल्ली उडवायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विटरवरून भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना चिंता काढला आहे.
https://twitter.com/ANI/status/1199282822353022976
दरम्यान, ‘क्रिकेट आणि राजकरणात काहीही घडू शकतं. ज्यावेळी आपण सामना हरतोय असं आपल्याला वाटतं, तेव्हा नेमकं त्याच्या उलट होतं’, असं विधान काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांनी केलं होतं. भाजपा आणि शिवसेना पक्षात मुख्यमंत्रिपदावरून वाद वाढल्याने जनतेनं स्पष्ट बहुमत मिळूनही त्यांना सरकार स्थापन करता आलं नव्हतं. त्यावेळी, गडकरींनी हि प्रतिक्रिया दिली. शनिवारी जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तेव्हा गडकरींच्या या वाक्याची चर्चा झाली होती. परंतु आज भाजप सरकारच्या अपयशावर त्याच वाक्यावरून नवाब मलिक यांनी त्यांची विकेट काढायचा प्रयत्न केलाय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का इश्तिफ़ा महाराष्ट्र की जनता की जीत है।
जय महाराष्ट्र ।@NCPspeaks— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 26, 2019
शरद पवार हे आयसीसीचे अध्यक्ष होते, हे बहुधा नितीन गडकरी विसरले असावेत. आता केलं ना क्लीन बोल्ड?, असा खोचक टीका नवाब मलिक यांनी केली. तसेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने महाराष्ट्रातील जनतेचा विजय झाला असल्याचेही मलिक म्हणाले.
बीजेपी नेता @nitin_gadkari जी
कह रहे थे की क्रिकेट और राजनीति
में कभी भी और कुछ भी हो सकता है ,
शायद वे भूलगए थे @PawarSpeaks ICC के अध्यक्ष रह चुके हैं ,
कर दियाना क्लीन बोल्ड ।#MaharashtraPolitics#MaharashtraGovtFormation— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 26, 2019