नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विधानसभा निवडणुकीच्या निकालाला १२ दिवस उलगडून गेले तरी राज्यात अजूनही स्थिर सरकार स्थापन झालेले नाही. बहुमत मिळूनही महायुतीत सत्तावाटपावरून जोरदार युद्ध सुरु आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यातील वाद खोलवर गेल्याने आता भाजप निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची चर्चाही रंगवली जात आहे, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस सरकारमधील मंत्री जय कुमार रावल यांनी केले आहे. रावल म्हणतात की, शिवसेनेच्या या आडमुठेपणामुळे नेते व कार्यकर्ते इतके नाराज आहेत की ते पुन्हा निवडणूक लढवून स्वबळावर सरकार स्थापन करण्यास तयार आहेत. ‘दरम्यान भाजपने केलेला हा कितपत योग्य आहे, हे पाहणे महत्वाचे आहे.
महाराष्ट्रात २०१४ आणि २०१९ या दोन्ही विधानसभा निवडणुकित मोठा फरक आहे. २०१४ च्या निवडणुकीवेळी भाजप आणि शिवसेनेने स्वतंत्र निवडणुका लढवल्या, परंतु २०१९ ह्या निवडणुकीत दोन्ही पक्ष युतीअंतर्गत लढले. २०१४ च्या निवडणुकीत भाजपाने एकट्याने २६० उमेदवार उभे करत १२२ जागा जिंकल्या होत्या. तर या युतीअंतर्गत भाजपने एकूण १६४ जागा लढवल्या आणि केवळ १०४ जागा जिंकल्या. त्याचवेळी २०१४ मध्ये शिवसेनेने २८८ पैकी २८२ जागांवर उमेदवार उभे केले होते आणि एकूण ६३ उमेदवार जिंकून विधानभवनात पोहोचण्यास यश मिळविले होते. यावेळी शिवसेनेने भाजपच्या सहकाऱ्याने केवळ १२४ जागा लढल्या आणि एकूण ५६ विधानसभा मतदारसंघात निवडणुका जिंकल्या. तसे पहिले तर २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीच्या निकालांच्या आधारे शिवसेनेचा स्ट्राइक रेट पाहिला तर पक्षाच्या यशाची टक्केवारी दुप्पटीपेक्षा जास्त झाली आहे.
२४ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र निवडणुकीच्या निकालानंतर भाजपाच्या जागांत घट झाल्याचे विचारले असता प्रश्नांच्या उत्तरात माध्यमांना एक महत्त्वाची वस्तुस्थिती मांडली होती. २०१४ च्या तुलनेत त्यांनी कमी जागा लढविल्या असल्याने आपल्या पक्षाच्या जागा कमी झाला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. परंतु त्यांचा पक्षाचा स्ट्राइक रेट खूप जास्त आहे. २०१४ मध्ये २६० जागांवर लढल्यानंतर भाजपाने १२२ जागा जिंकल्या. म्हणजेच तेव्हाचा त्याचा स्ट्राइक रेट ४६ टक्के होता. तर या वेळी भाजपाचा स्ट्राइक रेट ६४ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. आता याच आधारावर, जर भाजपा पुढील निवडणुका स्वबळावर असलेल्या सर्व २८८ जागांवर लढली आणि त्यांचा स्ट्राइक रेट कायम ठेवला तर पक्षाला राज्यात १८७ जागा मिळू शकतात. त्यामुळे आता भाजपचे पुढचे पाऊल काय असेल याकडे सर्वांचे लक्ष आहे.
Visit – www.bahujannama.com