वाई : बहुजननामा ऑनलाइन – ‘निवडणूक जवळ आल्या कि चारित्र्यहनन करणं किळसवाणं झालं आहे, गड किल्यांसंदर्भात मी केलेल्या विधानाचा वेगळा अर्थ घेतला जात आहे, किल्यांवर डान्स बार उघडा हा विचार करण्यापेक्षा मेलेलं बरं,’ अश्या भावना उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केल्या आहेत. वाई येथील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ह्या भावना व्यक्त केल्या.
सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचे उमेदवार उदयनराजे म्हणाले कि , ‘गड, किल्ले ही छत्रपती शिवरायांची प्रतीके आहेत. त्यामुळे त्यांचे संवर्धन व्हावे असे माझे नेहमी म्हणणें आहे. याबाबत सरकारनेही निर्णय घेतलं आहे, परंतु मी जे बोललो नाही , त्या गोष्टी माझ्यावर लादण्यात येत आहेत, माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला जात आहे. गड – किल्ले पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे, लोकांना किल्यावर जात यावं, त्यांची राहण्याची सुविधा व्हावी, त्यासाठी आवश्यक उपाययोजना व्हाव्यात यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. तसेच गड – किल्यांवर रोपवे व्हावा, पायथ्याशी राहण्याची सोय व्हावी असे मत मी मांडले होते. परंतु, मी जे बोललोच नाही ते , ते माझ्या माथी मारले जात आहे.
ऐतिहासिक वस्तूंची डागडुजी झाली तर रोजगार निर्मिती होईल , मी संकुचित वृत्तीचा नाही, निवडणूक जवळ आली कि काही जण चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न करतात, तसेच मी जिल्याचे प्रश्न मोदींपुढे मांडणार असून विकासात कुठेही कमी पडणार नाही असेही उदयनराजे यांनी या पत्रकार परिषदेत म्हणले.
Visit : bahujannama.com