नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रातील सत्तास्थापनेसाठी राज्याबरोबर दिल्लीत नेत्यांच्या बैठकी सुरु आहेत. कालच (सोमवारी)शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात बैठक झाली . बैठकीनंतर शरद पवार यांनी सोनिया गांधी यांच्याशी कुठलीही झाली नाही, आम्ही राज्याच्या घडामोडींवर लक्ष ठेऊन आहोत, असे म्हणत शिवसेनेच्या पाठिंब्याबाबत ठोस भूमिका मांडली नाही. तरी उद्या काँग्रेस -राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होणार असून या बैठकीनंतर सत्ता स्थापनेसंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मिळाली आहे.
याबाबत राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी सांगितले की, सध्या राज्यात राष्ट्रपती राजवट सुरु आहे. राष्ट्रपती राजवट हटविण्यासाठी तिन्ही पक्षांना एकत्र येणे गरजेचे आहे . शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याबाबत आणि राष्ट्रपती राजवट संपुष्टात आणण्यावर आमचं एकमत आहे. त्यासाठीच उद्या काँग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चा होणार असून शिवसेनेचा सन्मान ठेवणे ही आमची जबाबदारी असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे. त्याचसोबत मुख्यमंत्रिपदावरून आमच्यात भांडणं होणार नाहीत असंही मलिका यांनी स्पष्ट केले.
तसेच माध्यमांनी काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेला महाशिवआघाडी असं नावं दिलं, पण हे बरोबर नाही. कारण आतापर्यंत देशात जिथे कुठे आघाडी झाली तिथे कुठल्या एका पक्षाचं नाव कधी त्यात आलं नाही. पक्षाला पुलोद, संयुक्त पुरोगामी आघाडी ,लोकशाही आघाडी अशी नावं दिली आहेत, अश्या पद्धतीने मलिक यांनी महाशिवआघाडी या नावावर आक्षेप घेतला. दरम्यान, पवारांच्या विधानानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले की, शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात बैठक सुरु आहेत, ज्येष्ठ नेते राज्याच्या हिताचाच निर्णय घेतील. भाजपाला सत्तेपासून कसं दूर ठेवता येईल यावर चर्चा सुरु आहे. मित्रपक्षांची मंजुरी देखील महत्वाची आहे, दिल्लीत जो निर्णय होईल तो मान्य असेल असंही थोरातांनी स्पष्ट केलं.
Visit : bahujannama.com