मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यातील सत्तास्थापनेच्या तिढ्यावरुन शिवसेना- भाजपची समीकरण न जुळल्याने महाशिवआघाडीचं नवीन समीकरण निर्माण झालं. तरी भाजपने शिवसेनेवर कोणत्याही प्रकारची टीका केलेली नव्हती, मात्र इतक्या दिवसांपासून शांत असलेल्या भाजपचा संयमाचा बांध फुटला असून भाजपने उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढविला आहे. शिवसेनेच मोदींवरील प्रेम स्वार्थी की निस्वार्थी ? हे जनतेला माहित आहे असा टोला भाजपा नेते आशिष शेलार यांनी लगावला आहे. आशिष शेलार म्हणाले की, संजय राऊत मोदीजींबद्दल प्रेम व्यक्त करत आहेत, पण ते स्वार्थी की निस्वार्थी हे जनतेला माहित आहे. नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात संबंध बिघडविण्याचे एकपात्री नाट्य आम्ही रोज टीव्हीवर पाहतो. संजय राऊत यांना समजण्यासाठी अजून बराच काळ लागेल असा म्हणत त्यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.
शेलार यांनी संजय राऊतांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. वयासोबत त्यांच्या विचारांची परिपक्वताही वाढावी, असे त्यांने यावेळी सांगितले. बाळासाहेबांच्या आदरापोटी मातोश्रीवर नेत्यांची ये -जा असायची, आता सत्तेच्या लालसेपोटी हॉटेलला चर्चेसाठी जावं लागत आहे. राजकीय स्वार्थासाठी खोत पसरवणं हे अमान्य आहे. कुटुंबातील राज ठाकरेंनाही भेटायला मातोश्रीहून कोणी जात नव्हतं. आज मातोश्रीतून बाहेर पडत माणिकराव ठाकरेंना भेटायला जात आहेत असा टोला आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनी भाजपने केलेले आरोप फेटाळले आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील अशी घोषणा पंतप्रधानांनी व मी जाहीर भाषणातून केली. त्यावेळी शिवसेनेने आक्षेप का घेतला नाही, असे वक्तव्य अमित शाहा यांनी केले होते. त्यावर राऊत यांनी उत्तर देताना म्हंटले कि, पंतप्रधानांना खोटे पाडण्याची आमची इच्छा नाही, ज्यामुळे पंतप्रधानांचा अपमान झाला असता. मोदी आदरणीय आहेत आणि नेहमी राहतील. त्यामुळे आम्ही हस्तक्षेप केला नाही. बाळासाहेबांच्या खोलीमध्ये बंद दाराआड उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यामध्ये चर्चा झाली. हे मोदींपर्यंत पोहोचविले गेले नाही. त्यामुळे हा गोंधळ झाला. बंद दाराआड झालेली चर्चा काय होती हे अमित शाह यांनी उघड करावे. असंही राऊत यांनी सांगितले.
Visit : bahujannama.com