कणकवली : बहुजननामा ऑनलाइन – शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी कणकवली येथील प्रचार सभेत नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे, ठाकरे म्हणाले कि, ‘करून करून भागले आणि देवपूजेला लागले अशी नारायण राणे यांची अवस्था आहे, ते ज्या कोणत्या पक्षात जातात त्या पक्षाची वाट लावतात, ते शिवसेनेत होते त्यांना काढलं. नंतर ते काँग्रेसमध्ये गेले त्यांना काढलं आता हा शेवटचा पर्याय आहे, हा लढा सुसंस्कृत आणि खुनशी प्रवृतीच्या विरोधातील आहे,’असे बोलत उद्धव ठाकरे यांनी राणेंना धारेवर धरले. तसेच आपली सत्ता येताच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून मिळेल असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले.
‘पाठीत खंजीर खुपसणारी ही औलाद आहे. ज्या ज्या पक्षाला ते सोडून गेले त्या त्या पक्षाला ते शाप आहेत, त्यामुळे माझ्या मित्राला हा शाप नको आहे, म्हणून मी भाजपाला सावध करत आहे. भाजप पक्षात खुनशी प्रवृत्ती नको. वाकवली ती मने आणि मान आणि पक्ष कोणता स्वाभिमान, आता स्वाभिमानी शब्द देखील खुश झाला असेल. मी इथं टीका करायला नाही तर भाजपला सावधानतेचा इशारा द्यायला म्हणून मी इथं आलो आहे, नाहीतर हि भूत तुमच्या मानगुटीवर बसायला कमी करणार नाहीत, माझ्या मित्राच्या घरात चोर घुसत आहे, मग मी शांत कसा बसू ? ‘असे बोल उद्धव ठाकरे यांनी चांगलेच सुनावले आहेत.
इतके वर्ष आम्ही त्यांना पाळले, मात्र ते आता आमच्या मित्राकडेही नको आहेत, म्ह्णून आम्ही भाजपला सावध करत आहोत कोकणी जनता भोळी आहे, परंतु अजूनही मर्दुमकी आहे, हे कोणीही विसरू नये , कोणी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला ते मोडून टाकू. येणाऱ्या काळात कोकणात भगवा फडकणार हे नक्की आहे. असे उद्धव यावेळी म्हणाले. जर मुख्यमंत्र्यांनी एखादा चांगला उमेदवार दिला असता तर आम्ही नक्कीच त्यांच्या प्रचार केला असता, परंतु ज्यांना संधी मिळाली त्यांना शिवसेनेन हाकलून दिल होत, एवढेच नव्हे तर काँग्रेस मध्ये देखील त्यांनी असच केलं त्यानंतर स्वतःचा पक्ष काढला, आणि आता परत भाजपमध्ये गेले , त्यामुळे मी भाजपला शुभेच्छा देतो. असेही उद्धव यांनी म्हंटले आहे. नाणार उभा करून माझा कोकण जर तुम्ही भुईसपाट करणार असाल तर मला हा विकास नको आहे, असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
Visit : bahujannama.com