मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीसाठीचा मानखुर्द -शिवाजीनगर या मतदारसंघातून रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज माघारी घेणार असल्याचे समजले आहे. यासंबंधीची अधिकृत घोषणा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली. गौतम सोनवणे यांनी वांद्रा येथील संविधान या निवास्थानी रामदास आठवले यांची भेट घेतली.
दरम्यान याआधी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रामदास आठवले यांची भेट घेल्याची माहिती मिळाली आहे. उद्धव ठाकरे यांनी सोनवणे यांची भेट घेत मानखुर्द- शिवाजीनगर येथे दाखल केलेला अर्ज मागे घेण्याची विनंती केली. तसेच रामदास आठवले यांनी देखील त्यांना भविष्यात योग्य संधी देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे सोनवणे यांनी अर्ज माघार घेण्याच्या निर्णयाने शिवसेना उमेदवाराला दिलासा मिळणार असल्याचे समजत आहे. याबरोबर ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत त्या ठिकाणी रिपाइंने उभे केलेल्या उमेदवाराचे अर्ज मागे घेण्याबाबत रामदास आठवले आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली आहे.
तसेच रामदास आठवले यांनी भाजप शिवसेनेची महायुती हि अभेद्य असून रिपाइचा त्याला सर्वतोपरी साथ देणार असल्याचे सांगितले आहे. तसेच गौतम सोनवणे यांनी म्हणाले कि, रामदास आठवले यांचा आदेश मान्य करत आपण अर्ज मागे घेत आहोत. शिवसेनेने विठ्ठल लोकरे यांना मानखुर्द शिवाजीनगर मतदार संघात उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान काँग्रेस – राष्ट्रवादी पक्षातील अनेक नेते भाजप शिवसेनेत प्रवेश करत आहेत, परंतु भाजपचे काही नेते रिपाइंमध्ये प्रवेश करत आहेत. नांदेडमधील भाजपचे नेते राजेश पवार यांनी तसेच परभणीचे भाजप आमदार मोहन फड यांनी देखील रिपाइंमध्ये प्रवेश घेतला असून पवार यांना नायगाव विधानसभा मतदार संघातून तर फड यांना पाथरी येथून उमेदवारी देण्यात आली आहे.
Visit : bahujannama.com