मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यातील विधासभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. सर्वच पक्ष आपल्या उमेदवाराच्या प्रचाराची जय्यत तयारी करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ बीडमधून सुरुवात केली. यावेळी त्यांनी कलम ३७० हा देशहितासाठी घेण्यात आलेला निर्णय आहे , परंतु विरोधकांनी त्याला नेहमीच विरोध केला, भाजप नेहमीच ३७० विरुद्ध होते, त्यामुळे आम्ही जनहिताचा निर्णय घेतला, तसेच पुन्हा आपलेच सरकार येणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त करत मोदी यांनी ही सभा गाजवली. मात्र , दुसरीकडे पंतप्रधांना गोपीनाथ मुंडे यांचा विसर पडल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.
महाआघाडीचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारार्थ विडा येथे लोकांशी संवाद साधला. आज मोदींच्या सभांसाठी छापलेल्या जाहिरातीत स्व. गोपीनाथ मुंडे साहेब यांचा साधा फोटोसुद्धा नव्हता. मोदींनी गोपीनाथ गडाकडेही पाठ फिरवली. माझ्या जीवनातील हा सर्वात वाईट दिवस होता. pic.twitter.com/onqCzDhcUd
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) October 17, 2019
धनंजय मुंडे म्हणाले कि , ‘ आज मोदी यांच्या सभांसाठी छापलेल्या पोस्टरमध्ये गोपीनाथ मुंडे यांचा फोटो देखील नव्हता, त्यामुळे दिवंगत लोकनेत्याचा अपमान कसा करायचा हे भाजपला चांगलाच माहित आहे. त्यामुळे मी आजचा दिवस कधीच विसरू शकत नाही , असेही ते म्हणाले. मोदींनी गोपीनाथ मुंडेंकडे पाठ फिरवली आहे.
दरम्यान सर्व कार्यकर्ते आणि शरद पवार यांनी सर्वमताने नमिता मुंदडा यांना उमेदवारी जाहीर केली होती, मात्र त्यांनी पक्षांतर केले , याला बेईमानी म्हणतात, त्यामुळे ही लढाई आता इमानदारी विरुद्ध बेईमानीची आहे. त्यामुळे बेईमानी लोकांना तुम्ही केजच्या मातीत गाडा असे धनंजय मुंडे म्हणाले.
Visit : bahujannama.com