मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – उद्धव ठाकरेंनी एकदा परदेशातून मासे आणले होते, दुर्दैवाने ते मासे मेले. मग, हे महाराज दोन दिवस घराबाहेरच पडले नाहीत, कारण मासे मेल्याचं दुःख त्यांना अनावर झालं होतं. तुम्हाला मासे मेले तर दु:ख होतंय. मग आमचं ब्लड रिलेशन आहे. मग दु:ख होणारच. समजा, बाळासाहेब असते आणि त्यांच्याबाबतीत असे काही घडले असते, तर उद्धव ठाकरेंच्या डोळ्यातून पाणी आलं नसतं का ? असा प्रश्न अजित पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.
पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या राजीनाम्यावर भाष्य केले त्यावेळी ते शरद पवारांविषयी बोलताना भावनिक झाले होते. हाच धागा पकडून उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांवर टीका केली. अजित पवारांचे अश्रू हे कर्माचे आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. याबाबतचा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर, बोलताना पवारांच्या जागी बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंच्या डोळ्यात अश्रू आले नसते का ? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.
राजीनामा भावनिक होऊन दिला होता का, असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना, ‘राजीनाम्याचा निर्णय हा भावनिक होऊन घेतला नव्हता. केवळ पत्रकार परिषदेत मी काही क्षण भावनिक झालो होतो, मी ते कंट्रोल करायचा प्रयत्न केला, पण मला कंट्रोल झालं नाही. त्यामुळे, मी राजीनाम्याचा निर्णय खूप विचाराअंती घेतला होता, असे अजित पवार यांनी सांगितले.
Visit : bahujannama.com