मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – विधानसभा निवडणूक अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपली आहे, त्यामुळे पक्षाचा प्रचारही जवळपास अंतिम टप्प्यात आहे. सर्वच नेते आपल्या पक्षाचा प्रचार करत सर्वांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहे. इकडे सत्ताधारी भाजप पक्षाचा प्रचार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठ्या प्रमाणात आघाडी घेत प्रचार करत आहेत. निवडणूक होण्याआधीच मुख्यमंत्र्यांनी आगामी मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचेच सरकार येणार असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी प्रचारात काही मंत्र्यांच्या नावाची घोषणा केली आहे.
कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे, माण -खटावमधून जयकुमार गोरे, पुसदमधून निलय नाईक आणि चांदवडमधून राहुल आहेर यांच्या प्रचारार्थ मंत्री बनविणार असल्याची माहिती दिली. मुख्यमंत्री यांनी निवडणुकीच्या प्रचारार्थ आतापर्यंत आगामी ४ मंत्र्यांची नाव जाहीर केली आहेत. दरम्यान कर्जत-जामखेड मतदार संघात राम शिंदे यांच्या विरुद्ध राष्ट्रवादीचे रोहित पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे हि लढाई रंगत ठरणार आहे. तरी राम शिंदे यांना ५० हजारांनी निवडून द्या असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
साताऱ्यातील माण -खटाव मतदार संघातदेखील अशीच चुरशीची लढाई आहे. भाजपने जयकुमार गोरे, यांच्या विरुद्ध शिवसेनेचे बंडखोर उमेदवार शेखर गोरे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार आहे, त्यामुळे याठिकाणीही मुख्यमंत्र्यानी जयकुमार गोरे यांना विजयी करा असे आवाहन करत त्यांना मंत्री पद देण्याचं आश्वासन दिले आहे. पुसद मतदार संघात भाजपने निलय नाईक यांना उमेदवारी दिली आहे, यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीचे उमेदवार इंद्रनील नाईक लढत देणार असून नाशिकच्या चांदवडमध्येही भाजपच्या राहुल आहेर यांच्याविरुद्ध काँग्रेस उमेदवार शिरीष कोतवाल यांच्यात जोरदार सामना रंगणार आहे. यावेळी मुख्यमंत्र्यानी निलय नाईक आणि राहुल आहेर या दोघांनाही मंत्री पण देण्याचं आश्वासन दिल आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यानी प्रचारासाठी वापरलेली ही ट्रिक यशस्वी ठरणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
Visit : bahujannama.com