मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात जोरदार टीका होताना दिसत आहे. शरद पवार यांनी नुकत्याच झालेल्या सभेत ज्या पद्धतीने हातवारे करत मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. जळगावातील सभेत बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही नटरंग नाही त्यामुळे आम्ही असे हातवारे कधीच करत नाही आणि ते आम्हाला शोभतही नाही. असे मुख्यमंत्री म्हणाले.
‘पवारांची मानसिकता ढासळल्याने ते असे हातवारे करत आहेत’
सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही नटरंग नाही त्यामुळे आम्ही असे हातवारे कधीच करत नाही आणि ते आम्हाला शोभतही नाही. पवारांची मानसिकता ढासळल्याने ते असे हातवारे करत आहेत.” असा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, पालकमंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री गुलाबराव पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची पहिली सभा आज जळगावात झाली. यावेळी मुख्यमत्र्यांनी मतदारांना संबोधित केलं.
का आणि काय म्हणाले होते शरद पवार ?
शरद पवार यांनी बार्शीचे राष्ट्रवादीचे उमेदवार निरंजन भूमकर यांच्यासाठी प्रचारसभा घेतली होती. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले होते की, “मुख्यमंत्री म्हणतात, इथे लढायचं नाही. कुस्ती लढण्यासाठी समोर कोणीच नाही. परंतु कुस्ती पैलवानांची होते. अशांची(हातवारे करत) होत नाही.”असं म्हटलं होतं. यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी यावर आक्षेप घेतला होता. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी सभेत बोलताना म्हटले होते की, आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत मात्र समोर कोणी विरोधकच नाही. याच वक्तव्याला पवारांनी प्रत्युत्तर दिले होते.
Visit : bahujannama.com