जळगाव : बहुजननामा ऑनलाइन – काहीच दिवसात विधानसभेची निवडणूक होणार आहे, त्यातील प्रचारही अंतिम टप्यात आला आहे. पक्षनेत्यांची आरोप- प्रत्यारोपाची, गौप्यस्फोटाची फेरी सुरूच आहे. त्यात नुकताच एकनाथ खडसे यांनी युतीबाबत एक महत्वाचा खुलासा केला आहे. २०१४च्या निवडणुकीत युती तोडली नसती तर मुख्यमंत्री हा एकटा भाजपचा नसता, तसेच येणार मुख्यमंत्री भाजपचा नसेल तर युतीचा असणार आहे, असे देखील खडसे यांनी स्पष्ट केले.
खडसे पुढे म्हणाले कि, ‘गेली ४०-५० वर्ष मी पक्षासाठी काम केल आहे, त्यामुळे माझ्याकडे जनतेची साथ आहे, जनतेचे प्रेम आहे, त्यामुळे मी कधीच संपणार नाही. निवडणूक लढवावी हि माझी इच्छा होती, परंतु पक्षाचा निर्णय मला मान्य आहे, तरी पक्षाने हा निर्णय का घेतला ? याच उत्तर मी पक्षाला विचारत राहणार आहे. तसेच तरी मी पक्षाविरुद्ध बोलणार नाही, जे काही बोलायचं ते पक्षप्रमुखांशी बोलेन.; यावेळी खडसे यांनी शरद पवारांच्या ईडीच्या चौकशी संदर्भातदेखील मत व्यक्त केलं आहे. ते म्हणले कि, शरद पवार यांनी कितीतरी पक्ष बदलले आहेत, ती वस्तुस्थिती आहे, पवारांवर झालेली आदींची चौकशी हि सरकारच्या नाही तर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार करण्यात आली. मला जे वाटते ते मी बोलतो, मी सत्तेचा लालची नाही.
खडसे यांनी यावेळी काँग्रेसवर देखील जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले कलम ३७० हा देशाशी संबंधित विषय आहे. माझं घर , माझं जिल्हा सुरक्षित राहावं असा आपल्यापुरता विचार करणाऱ्या लोकांना ३७० च महत्व काय कळणार ? आम्हाला देशही तितकाच महत्वाचा आहे, तसेच खडसे यांनी कलम ३७० रद्द केल्यामुळं देश अखंड आहे हे सिद्ध केल्याबद्दल सरकारच कौतुकही केलं. यावेळी त्यांनी प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांची उणीव जाणवत असल्याचेही खडसे यांनी यावेळी म्हंटले आहे. ते असते तर देशाचं चित्र वेगळं असत असेही ते म्हणाले.
Visit : bahujannama.com