मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यपाल विद्यासागर राव यांचे विधिमंडळातील अभिभाषण महाराष्ट्रातील जनतेचा भ्रमनिरास करणारे असल्याची टीका विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. तसेच राज्यपालांचे अभिभाषण पाहिल्यानंतर ‘राम गड के शोले’ नावाचा अतिशय निकृष्ट दर्जेच्या चित्रपटाची आठवण होत असल्याचा टोलाही मुंडे यांनी लगावला.
जेव्हा राज्यपालांनी अभिभाषणाची प्रत वाचली त्यावेळी असे वाटले की, एखांदा इतिहासात उत्कृष्ट चित्रपट होऊन जातो, जसा रमेश शेपिचा ‘शोले’ सारखा वाटतो. मात्र प्रत्यक्षात सरकारची मागील चार वर्षातील कामगिरी बघतीली तर ‘राम गड के शोले’ नावाचा अतिशय निकृष्ट दर्जाचा चित्रपट आठवतो. असा खोचक टोला धनंजय मुंडेंनी लगावला.
राज्य सरकारने लिहून दिलेले राज्यपाल यांचे अभिभाषण होते. राज्यात सर्व ठीकठाक सुरु असल्याचा भाषण सरकारने राज्यपालांच्या तोंडी घातले. मात्र प्रत्यक्षात वस्तुस्थिती पाहिली तर लक्षात येते की, राज्य सरकार आंधळा चौकीदार आहे.