मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून मोठी वाढ होत आहे. काल राज्यात 57 हजार रुग्ण आढळून आले होते. कालच्या तुलनेत आजच्या रुग्णसंख्येत घट झाली असली तरी हा आकडा 45 हजार ते 50 हजारांच्या दरम्यान असल्याने अद्याप धोका कायम आहे. गेल्या 24 तासात राज्यात 47 हजार 288 नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. कालच्या रुग्ण संख्येच्या तुलनेत आज 9 हजारांची घट आहे.
राज्यात रुग्ण संख्या वाढत असताना आज दिलासा देणारी बाब म्हणजे, गेल्या 24 तासात 26 हजार 252 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत 25 लाख 49 हजार 075 इतकी झाली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.36 टक्के इतके झाले आहे. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटले आहे. आज राज्यात 155 रुग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत 56 हजार 033 जणांना जीव गमवावा लागला आहे. राज्यात रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण 1.83 टक्के आहे.
सध्या राज्यामध्ये 4 लाख 51 हजार 375 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात आहेत पुण्यात 81 हजार 378 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 07 लाख 15 हजार 793 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 30 लाख 57 हजार 885 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 14.76 टक्के आहे. सध्या राज्यात 24 लाख 16 हजार 981 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 20 हजार 115 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यातील प्रमुख शहरातील अॅक्टिव्ह रुग्ण
देशामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात पुण्यात सर्वाधिक 81378, मुंबई 73281, ठाणे 57635, नाशिक 34540, औरंगाबाद 16818, नांदेड 11299, नागपूर 55926, जळगाव 7141, अहमदनगर 15716 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
Mahrashtra reports 47,288 new #COVID19 cases, 26,252 discharges and 155 deaths.
Total cases: 30,57,885
Total discharges: 25,49,075
Death toll: 56,033
Active cases: 4,51,375 pic.twitter.com/a9YLlwdzsu— ANI (@ANI) April 5, 2021