मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक पहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून येत आहेत. शिवाय, रुग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी वाढ दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात आता पुन्हा एकदा लॉकडाऊनची चर्चा सुरु झाली आहे. तर प्रशासनाकडून निर्बंध अधिकच कडक केले जात आहेत. लसीकरण मोहीम देखील सुरु आहे. मात्र तरी देखील कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत असल्याने, सरकारसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, आज दिवसभरात राज्यात 43 हजार 183 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 249 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Maharashtra reports 43,183 new COVID-19 cases, 32,641 recoveries, 249 deaths in the last 24 hours
Total cases: 28,56,163
Total recoveries: 24,33,368
Active cases: 3,66,533
Death toll: 54,898 pic.twitter.com/aPpugamW74— ANI (@ANI) April 1, 2021
आज राज्यात 32 हजार 641 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 24 लाख 33 हजार 368 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटत चालले आहे. सध्या राज्यामध्ये कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.2 टक्के आहे. रुग्ण वाढत असताना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज राज्यात 249 रुग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत 54 हजार 898 जणांना जीव गमवावा लागला आहे. राज्यात रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण 1.92 टक्के आहे.
सध्या राज्यामध्ये 3 लाख 66 हजार 533 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात आहेत पुण्यात 64 हजार 599 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 99 लाख 75 हजार 341 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 28 लाख 56 हजार 163 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 14.3 टक्के आहे. सध्या राज्यात 19 लाख 09 हजार 498 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 18 हजार 432 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यातील प्रमुख शहरातील अॅक्टिव्ह रुग्ण
देशामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात पुण्यात सर्वाधिक 64599, मुंबई 54807, ठाणे 42151, नाशिक 36292, औरंगाबाद 13482, नांदेड 10006, नागपूर 48806, जळगाव 6969, अहमदनगर 9857 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.