मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात दिवसेंदिवस कोरोना संसर्गाचा उद्रेक पहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत असून, मत्यूंच्या संख्येतही मोठी वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक निर्बंध लागू करत, राज्यात रात्रीची संचारबंदी देखील घोषित केली आहे. तर मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले आहे. मागील काही दिवसांपासून 30 हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत होते. मात्र, आज (मंगळवार) काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासांत 27 हजार 918 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने राज्यात लॉकडाऊन लागू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज राज्यात 23 हजार 820 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 23 लाख 77 हजार 127 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटत चालले आहे. सध्या राज्यामध्ये कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.71 टक्के आहे. रुग्ण वाढत असताना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज राज्यात 139 रुग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत 54 हजार 422 जणांना जीव गमवावा लागला आहे. राज्यात रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण 1.96 टक्के आहे.
Maharashtra reports 27,918 new #COVID19 cases, 23,820 discharges and 139 deaths in the last 24 hours.
Total cases 27,73,436
Total recoveries 23,77,127
Death toll 54,422Active cases 3,40,542 pic.twitter.com/xp5pcX9dsF
— ANI (@ANI) March 30, 2021
सध्या राज्यामध्ये 3 लाख 40 हजार 542 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात आहेत पुण्यात 57 हजार 694 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 96 लाख 25 हजार 065 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 27 लाख 73 हजार 436 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 14.13 टक्के आहे. सध्या राज्यात 16 लाख 56 हजार 697 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 17 हजार 649 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यातील प्रमुख शहरातील अॅक्टिव्ह रुग्ण
देशामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात पुण्यात सर्वाधिक 67694, मुंबई 47742, ठाणे 37512, नाशिक 28979, औरंगाबाद 20525, नांदेड 15668, नागपूर 45303, जळगाव 6565, अहमदनगर 8127 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.