मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक पहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत चालला आहे. राज्यातील कोरोना परिस्थितीमुळं कठोर निर्बंध लागू केले आहेत. मात्र राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामध्ये गेल्या 24 तासात राज्यात तब्बल 59 हजार 907 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 322 रुग्णांना जीव गमवावा लागला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. नव्याने कोरोनाचा संसर्ग होण्याची ही संख्या एवढी झपाट्याने वाढत चालली आहे की, येत्या काळात कोरोनाची परिस्थिती अधिकच गंभीर होण्याची चिन्ह आहेत, त्यामुळे नागरिकांनी लागू केलेल्या निर्बंधाचे काटेकोर पालन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
राज्यात आज 59907 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 30296 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 2613627 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 501559 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.36% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 7, 2021
आज राज्यात 30 हजार 296 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 26 लाख 13 हजार 627 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटत चालले आहे. सध्या राज्यामध्ये कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.36 टक्के आहे. रुग्ण वाढत असताना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज राज्यात 322 रुग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत 56 हजार 652 जणांना जीव गमवावा लागला आहे. राज्यात रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण 1.79 टक्के आहे.
Maharashtra reports 59,907 new COVID cases, 30,296 recoveries, and 322 deaths in the last 24 hours
Total cases: 31,73,261
Active cases: 5,01,559
Total recoveries: 26,13,627
Death toll: 56,652 pic.twitter.com/eWsr5P17CT— ANI (@ANI) April 7, 2021
सध्या राज्यामध्ये 5 लाख 01 हजार 559 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात आहेत पुण्यात 90 हजार 048 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 11 लाख 46 हजार 736 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 31 लाख 73 हजार 261 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 15.00 टक्के आहे. सध्या राज्यात 25 लाख 78 हजार 530 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 21 हजार 212 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यातील प्रमुख शहरातील अॅक्टिव्ह रुग्ण
देशामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात पुण्यात सर्वाधिक 90048, मुंबई 83185, ठाणे 65431, नाशिक 33575, औरंगाबाद 18621, नांदेड 11309, नागपूर 59595, जळगाव 8061, अहमदनगर 18609 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.