मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाने गुन्हा दाखल केला आहे. शरद पवार यांनी या प्रकरणावर आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी सांगितले की, ईडीने माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे हे काल संध्याकाळी कळलं.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी बराच काळ मुंबईच्या बाहेर राहण्याची शक्यता आहे. ईडीला मला काही प्रेमाचा संदेश पाठवायचा असेल आणि मी उपलब्ध नसेल किंवा कोणत्या अदृश्य ठिकाणी गेलो तर, त्याआधीच २७ सप्टेंबरला दुपारी दोन वाजता मुंबईतील ईडीच्या कार्यालयात मी स्वतःहून जाणार आहे. तसेच सरकारवर निशाणा साधतांना, शिवाजी महाराजांचे राज्य आहे.
महाराष्ट्रावर शिवाजी महाराजांचे संस्कार आहे. दिल्लीच्या तख्तासमोर झुकणे आम्हाला पसंत नसल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सहकारी बँकेतील कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी जेष्ठ नेते शरद पवार यांच्यासह बँकेच्या तत्कालीन संचालकांवर सक्तवसुली संचलनालयाने ईडी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आपली भूमिका त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केली.
Visit : bahujannama.com