मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात वाढत असून राज्यात मागील दीड महिन्यापासून लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या राज्यातील नागरिकांना दिलासादायक बातमी आहे. 3 मे नंतर राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर आणि औरंगाबादसह इतर रेड झोन वगळता इतर झोनमध्ये परिस्थिती पाहून आतापेक्षा अधिक मोकळीक दिली जाईल. लॉकडाऊनमध्ये अधिक शिथिलता दिली जाईल, असं सांगतानाच पण ही शिथिलता देताना कोणतीही घाईगडबड करण्यात येणार नाही. तुम्ही देखील मोकळीक दिल्यानंतर काळजी घ्यायची आहे. नाही तर आजवर केलेल्या तपश्चर्येवर पाणी फिरेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
राज्यात लॉकडाऊन संपण्यास अवघे दोन दिवस उरले आहेत. यापार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधत रेड झोन वगळता इतर ठिकाणी लॉकडाऊनमध्ये शिथिलता देत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यातील लॉकडाऊनची मुदत येत्या 3 मे रोजी संपत आहे. त्यामुळे पुढे काय होणार असा अनेकांच्या मनात प्रश्न आहे. मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर आदि जिल्हे राज्यातील रेड झोनमध्ये आहेत. त्यामुळे 3 मे नंतर या ठिकाणी शिथिलता देणं योग्य ठरणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
CM Uddhav Balasaheb Thackeray addressing the State https://t.co/AjHM5lSdt1
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 1, 2020
ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता देता येईल. आता जेवढी बंधने आहेत, त्यापेक्षा अधिक मोकळीक देता येईल. पण त्यासाठी कोणतीही घाई करण्यात येणार नाही. नाही तर बंधन उठवल्यानंतर हाच विषाणू पुन्हा उलटायला नको. त्यासाठी धीराने आणि खंबीरपणे आपल्याला पाऊल टाकायचे आहे. त्यामुळे रेड झोनवगळता इतर ठिकाणी टप्प्याटप्प्याने काही गोष्ट सुरु करण्यात येईल. आपलं जीवनमान पुन्हा रुळावर आणता येईल, अस उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
एनपीन्यूज24 नेटवर्क